A Journey of Duty and Regret
By John Aguiar
The bags were packed and the schedules were finalized. The vibrant spirit of the Goa float was ready to represent our "emerald land" at the 1997 Republic Day Parade in the National Capital. As an officer for the Department of Information and Publicity, my mind was already at the Rabindra Rangshalla camp, visualizing the logistics and coordinating with the artists.
But in a quiet corner of our home, the atmosphere was heavy. My father, still recovering from a recent heart attack, watched me with uncharacteristic vulnerability. His eyes, usually a source of strength, were moist.
"Is it necessary to go?" he asked softly.
I responded with the practical logic of a dedicated professional. I told him the department, led by Director Mr. K. V. Prabhugaonkar, relied on me. I was the bridge between the artists and the administration. I used the words we often use to comfort ourselves: "You are a strong man. Nothing will happen. I’ll be back as soon as the parade is over."
He looked at me with a weight I didn’t yet understand and said, "Don’t go. I am not feeling well."
I left anyway. I boarded the train at Margao, the rhythm of the tracks drowning out the quiet plea of a father who knew his time was short.
The Contrast of Celebration
In Delhi, the days were a whirlwind. While I was coordinating movements and attending functions at the PMO and Rashtrapati Bhavan, my heart was tethered to a telephone line. In that era before mobile phones, a brief STD call was our only bridge. Papa didn't say much; he was never one for long-distance chatter. I took his silence for stability.
On January 29th, the celebration ended abruptly. A message reached Goa Sadan: Father’s condition is critical.
The transition from the triumph of the parade to a frantic rush was a blur. I was already on a train for the long journey home when the staff of Goa Sadan intercepted me. They pulled me from my compartment with news that transcended words: an air ticket had been booked for the morning. In that moment, the weight of the Delhi sky felt like it was collapsing.
The Silence of the Return
The flight back—IC 467—was a hollow experience. I was not alone in my grief; Late Shri Shivdas Verekar, then the MLA of Ponda and a family friend, was traveling with me from Delhi to Goa. His kindness during that journey remains a blur of gratitude and dread. Upon landing, he drove me directly from the airport to our home in Tiska, Ponda.
When I finally walked through the doors, the silence was louder than any parade. There he lay, motionless. In the stillness of his face, I didn't just see peace; I felt the sting of his final request. It felt as though he were still holding onto that moment of departure—not because I had chosen my profession, but because I wasn't there to hold his hand when the curtain finally fell.
The Burden of the 'Strong Man'
We often tell our parents they are "strong" because we aren't ready to face their fragility. We prioritize our "duty" to our careers because we assume our parents will always be there to welcome us home.
I represented my state in the heart of the country, but I missed the most important event of my life: the final goodbye of the man who made me who I am. Today, the applause of the Republic Day crowds has faded, but the echo of his voice asking me to stay remains.
He was a strong man, indeed. But even the strongest men shouldn't have to say goodbye alone.
कर्तव्याचा प्रवास आणि एक शल्य
जॉन आगियार
१९९७ सालच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय राजधानीत आमच्या 'गोवा चित्ररथा'चे प्रतिनिधित्व करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती. माहिती आणि प्रसिद्धी विभागाचा अधिकारी म्हणून माझे मन आधीच दिल्लीच्या 'रवींद्र रंगशाळा' कॅम्पमध्ये पोहोचले होते. त्याकाळी श्री. के. व्ही. प्रभुगावकर हे माहिती आणि प्रसिद्धी संचालक होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नियोजन पूर्ण केले होते.
परंतु, आमच्या घराच्या एका कोपऱ्यात वातावरण मात्र वेगळेच होते. नुकत्याच येऊन गेलेल्या हृदयविकाराच्या झटक्यातून सावरणारे माझे पापा (बाबा) माझ्याकडे पाहत होते. त्यांचे डोळे आज विलक्षण ओलावले होते.
"जाणे गरजेचे आहे का?" त्यांनी हळूच विचारले.
मी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासारखे व्यावहारिक तर्क मांडले. मी त्यांना सांगितले की, विभागाला माझी गरज आहे. आपण स्वतःचे सांत्वन करण्यासाठी जे शब्द वापरतो, तेच मी त्यांनाही सांगितले: "तुम्ही खूप खंबीर आहात. काहीही होणार नाही. परेड संपली की मी लगेच परत येईन."
त्यांनी माझ्याकडे अशा एका जड अंतःकरणाने पाहिले, ज्याचा अर्थ मला तेव्हा समजला नाही. ते फक्त एवढेच म्हणाले, "नको जाऊस. मला आज नीट वाटत नाहीये."
पण मी गेलोच. मडगाव स्टेशनवरून मी ट्रेन पकडली. रुळांवरून धावणाऱ्या गाडीच्या आवाजात, आपल्या मुलाने थांबावे म्हणून एका पित्याने केलेली ती आर्त साद कुठेतरी हरवून गेली.
उत्सवातील विरोधाभास
दिल्लीतले ते दिवस तालीम आणि २६ जानेवारीच्या भव्य सोहळ्याच्या घाईगडबडीत निघून गेले. पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमांचे नियोजन करत असताना, माझे मन मात्र टेलिफोनच्या वायरला टांगलेले असायचे. २९ जानेवारी रोजी आनंदाच्या या वातावरणाला अचानक पूर्णविराम मिळाला. 'गोवा सदन'मध्ये निरोप आला: "वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे."
परेडच्या यशाचा आनंद क्षणात मावळला. मी ट्रेनमध्ये बसलोच होतो, इतक्यात गोवा सदनच्या कर्मचाऱ्यांनी मला शोधून बाहेर काढले. त्यांनी माझ्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाचे तिकीट आरक्षित केले होते.
परतीची ती सुन्न शांतता
विमानाचा तो प्रवास—IC 467—अत्यंत पोकळ आणि सुन्न करणारा होता. योगायोगाने, त्या काळातील आमदार (कै.) शिवदास वेरेकर हे देखील त्याच विमानातून माझ्यासोबत प्रवास करत होते. माझे दुःख पाहून त्यांनी मला धीर दिला. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनीच मला स्वतःच्या गाडीतून तिस्का, फोंडा येथील माझ्या घरापर्यंत सोडले. त्या कठीण काळात त्यांनी दाखवलेली ही माणुसकी आजही माझ्या स्मरणात आहे.
जेव्हा मी घराच्या उंबरठ्यात पाऊल ठेवले, तेव्हा तिथली शांतता कोणत्याही परेडच्या आवाजापेक्षा जास्त कानठळी बसवणारी होती. पापा तिथे निपचित पडले होते. त्यांच्या शांत चेहऱ्याकडे पाहून मला केवळ दुःखच झाले नाही, तर त्यांच्या शेवटच्या शब्दांचे शल्य मनाला टोचू लागले. मला असे वाटले की ते अजूनही माझ्यावर रागावले आहेत—मी एक कर्तव्यदक्ष अधिकारी होतो म्हणून नाही, तर त्यांचा शेवटचा पडदा पडताना त्यांचा हात धरण्यासाठी मी तिथे नव्हतो म्हणून.
'खंबीर माणूस' असण्याचे ओझे
आपल्या पालकांच्या नाजूक परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद आपल्यात नसते, म्हणून आपण अनेकदा त्यांना "तुम्ही खंबीर आहात" असे सांगून मोकळे होतो. आपण नोकरीतील 'कर्तव्याला' प्राधान्य देतो, पण त्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे नाते मागे सुटते.
मी देशाच्या राजधानीत माझ्या राज्याचे प्रतिनिधित्व केले खरे, पण ज्या माणसाने मला घडवले, त्यांचा शेवटचा निरोप देण्याची संधी मी गमावली. आज प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील त्या टाळ्यांचा कडकडाट ओसरला आहे, पण "नको जाऊस" म्हणणारा बाबांचा तो आवाज आजही काळजात घर करून आहे.
ते खरंच खूप खंबीर होते. पण कितीही खंबीर माणूस असला, तरी त्याने आपला शेवटचा निरोप एकट्याने घेऊ नये, हेच सत्य मला उमजले.
कर्तव्याचो प्रवास आनी एक शल्य
जॉन आगियार
१९९७ वर्साच्या प्रजासत्ताक दिसानिमित्त राश्ट्रीय राजधानींत आमच्या 'गोंयच्या चित्ररथाचें' प्रतिनिधित्व करपाची सगळी तयारी जाल्ली. माहिती आनी प्रसिद्धी विभागाचो अधिकारी म्हूण म्हजें मन पयलींच दिल्लीच्या 'रवींद्र रंगशाळा' कॅम्पात पाविल्लें. त्या काळार श्री. के. व्ही. प्रभुगांवकर हे माहिती आनी प्रसिद्धी संचालक आशिल्ले आनी तांच्या मार्गदर्शनाखाल आमी सगळें नियोजन पुराय केल्लें.
पूण, आमच्या घराच्या एका कोनशात वातावरण मात वेगळेंच आशिल्लें. हालींच येवन गेल्ल्या काळजाच्या आताकांतल्यान (Heart attack) सावरपी म्हजे पापा (बापूय) म्हजेकडेन पळयताले. तांचे डोळे आयज विलक्षण ओळावल्ले.
"वचप गरजेचें ?" ताणीं हळूच विचारलें.
हांवे एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासारके वेवहारीक तर्क मांडले. हांवे तांकां सांगलें की, विभागाक म्हजी गरज आसा. आपूण स्वतःचें सांत्वन करपाक जे उरफाटे शब्द वापरतात, तेच हांवे तांकांय सांगलें: "तुमकां काँय जावचें ना, तुम्ही खूब घट आसात. परेड सोंपली की हांव रोखडोच परत येतलों."
ताणीं म्हजेकडेन अशा एका जड काळजान पळयलें, ज्याचो अर्थ म्हाका तेन्ना समजलो ना. ताणी फक्त इतलेंच म्हणले, "नाका वचूंक. म्हाका आयज दिसना."
पूण हांव गेलोच. मडगांव स्टेशनार पावन हांवें ट्रेन धरली. रुळांवयल्यान धांवपी गाडयेच्या आवाजांत, आपल्या पुतान थांपचें म्हूण एका बापायन मारिल्ली ती आर्त साद खंय तरी शेणली.
उत्सवातलो विरोधाभास
दिल्लीतले ते दीस तालीम आनी २६ जानेवारीच्या व्हडल्या सुवाळ्याच्या धांवपळींत कशे गेले तें कळ्ळेंच ना. प्रधानमंत्री कार्यालय आनी राश्ट्रपती भवनातल्या कार्यावळींचें नियोजन करतना, म्हजें मन मात टेलिफोनाच्या वायरक घूसपल्लें आशिल्लें. २९ जानेवारीक उमेदीच्या ह्या वातावरणाक अचानक पूर्णविराम मेळ्ळो. 'गोवा सदन'त निरोप आयलो: "बापायची प्रकृती काळजी करपासारखी आसा."
परेडच्या यशाचो आनंद एका खिणांत गळ्ळो. हांव ट्रेनीत बसलोच आशिल्लों, तितल्यांत गोवा सदनच्या कर्मचाऱ्यांनी म्हाका सोदून भायर काडलो. ताणीं म्हजेखातीर दुसऱ्या दिसा सकाळीं विमानाचें तिकीट राखून दवरिल्लें. म्हाका करपाचे ते कयळे.
परतेची ती सुन्न शांतताय
विमानाचो तो प्रवास—IC 467—खूब रिंतो आनी सुन्न करपी आशिल्लो. योगायोगान, त्या काळांतले आमदार (कै.) शिवदास वेरेकर हेय त्याच विमानान म्हजे वांगडा प्रवास करताले. म्हजें दूख पळोवन ताणीं म्हाका धीर दिलो. विमानतळाचेर देवल्या उपरांत ताणींच म्हाका स्वतःच्या गाडयेंतल्यान तिस्क, फोंडेच्या म्हज्या घरापर्यंत पावयलो. त्या कठीण काळांत ताणीं दाखयले हे मनीसपण (humanity) आजूनय म्हज्या उगडासात आसा.
जेन्ना हांवें घराच्या उंबरठ्यार पांय दवरलो, तेन्ना थंयची शांतताय खंयच्याय परेडच्या आवाजा परस चड कानठळी बसोवपी आशिल्ली. पापा थंय निपचित पडिल्ले. तांच्या शांत तोंडाकडेन पळोवन म्हाका फकत दूखच जालें ना, तर तांच्या निमण्या उतरांचें शल्य मनाक टोचूंक लागलें. म्हाका अशें दिसलें की ते आजूनय म्हजेर रागावले आसात—हांव एक कर्तव्यदक्ष अधिकारी आशिल्लों देखून न्हय, तर तांचो निमणो पड्डो पडटना तांचो हात धरपाखातीर हांव थंय नाशिल्लों देखून.
'घट मनीस' आसपाचें ओझें
आपल्या आवय-बापाच्या नाजूक परिस्थितीक फुडो करपाची ताकद आमच्यांत नासता, देखून आमी जायते फावट तांकां "तुम्ही घट आसात" अशें सांगून सुटतात. आमी नोकरीतल्या 'कर्तव्याक' पयलें स्थान दितात, पूण त्या प्रवासांत सगल्यांत मोलादीक नातें फाटीं उरता.
हांवे देशाच्या राजधानींत म्हज्या राज्याचें प्रतिनिधित्व केलें खरें, पूण ज्या मनश्यान म्हाका घडोयलो, तांकां निमणो निरोप दिवपाची संद हांवें गमायली. आयज प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधल्या त्या टाळ्यांचो आवाज थंडावला आसतलो, पूण "नको वचूं" म्हणपी बाबांचो तो आवाज आजूनय काळजात घर करून आसा.
ते खरेंच खूब घट आशिल्ले. पूण कितलोय घट मनीस आसलो, तरी ताणें आपलो निमणो निरोप एकल्यान घेवचो न्हय, हेंच सत्य म्हाका उमजलें.


No comments:
Post a Comment